माझ्या उण्यापुर्या २७ वर्षांच्या आयुष्यामध्ये मी असाच वागत आलो, असे समजून की, हेच बरोबर आहे... पण आता समजतय की, नेहमी अस वागुन चालत नाही... काही वेळेला मोठी उडी मारायची असेल ना, की थोडे मागे आलेले बरे असते, त्याने उडी लांब जाते, असे वाठारे गूरुजीनी पहिलीमधे संगिताल्याचे आठवते, वाठारे गुरुजी कुठे आहेत हे माहिती नाही, पण त्यानी सांगितलेले शब्द बरोबर आहेत, अजुन...!!!

मनाच्या गाभार्यात काही गोष्टी दफन केल्या तर बर्या असतात, तशीच काही नाती असतात, ज्याना नाव न देता ती सांभाळावी लागतात, नाव नसल म्हणून काही त्या नात्यांचे महत्व कमी होत नाही... पण त्याच नाव सांगण्याची वेळ आल्यावर योग्य नाव नसल्याने त्याच्यावर बोट उठु शकत...!!!
का कुणास ठाउक पण काही वेळा काही बोलता आले नाही तरी, गप्प राहणे हा पर्याय नसतो!!!

0 comments:
Post a Comment