ज्याला नाही कुणी त्याला .....

काही माणसे गेल्यावर कधीच दु:ख होत नाही... आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी तुम्हाला विचार करावा लागतो की ही गोष्ट धरायची की सोडायची पण असे अनेक क्षण येतात ज्यावेळी निर्णय पटकन होतात... मनाच्या कोप-यात सुद्धा यत्किन्चितही भीती नसते की या निर्णयाने पुढे काय होईल... कसा ठरेल हा निर्णय - योग्य की अयोग्य...!!!



माझ्या २७ वर्षांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी निर्णय घेणे अवघड होते... माझ्या ग्रॅजुयेशन नंतर काय करायचे, पि.जि. नंतर काय, किंवा आत्ता काय, लग्न कुणाबरोबर करायचे, राहायचे कुठे (सेट्टल की काय ते?) व्हायचे... आयुष्य काय म्हणून काढायचे - एक शिक्षक की संशोधक, संगणक क्षेत्रात काही करायचे की सिनेमात जायचे.... पण एका सुद्धा वेळी योग्य निर्णय घेता आला नाही... किंबहुना योग्य निर्णय म्हणजे काय हेच कळले नाही, पदरी पडले आणि पवित्र झाले असे जे येईल समोर ते आपले ध्येय मानून फॉलो करत राहिलो आणि आज जिथं उभा आहे - एक प्रवासी म्हणून ज्याला पुढचा रस्ता माहिती नाही, ज्याचा पुढे जायचा मॅप हरवलाय... !!!



खूप विचार करून निर्णय घेतला किंवा न विचार करता घेतला की असंच काहीतरी होत असावं... मी कधी योग्य निर्णय घेतले नाहीत. आळस केला... सगळे माझ्याभोवती असायचे, माझे फ्रेंड्स म्हणून काही साथीदार म्हणून तर काही फक्त कलिग्ज म्हणून... मला फरक करता आला नाही - सगळे माझ्या भोवती जमले होते कारण त्यांना माझ्याकडून काही ना काही पाहिजे होते. सगळे माझा फायदा घेत गेले आणि मी त्यांना घेऊ देत गेलो, काहींनी माझे शारीरिक श्रम वापरले (माझी एक्स जि.एफ.), ब-याच लोकांनी माझ्याकडील थोड्याफार वित्ताचा फायदा करून घेतला....
माझं ब-यापैकी असं झाला होतं - ज्याला नाही कुणी त्याला "राहुल महामुनी"


...

0 comments:

Post a Comment