लंगडा घोडा...

लहानपणापासून मी हुशार समाजाला जायचो... वडिलांच्या मार्कांच्या वलयामुळे मला हुशारीचा टॅग ऑटोमॅटिक आला होता... सगळे ठीक होत्ते पण मला अभ्यास ह्या गोष्टीचा कंटाळा यायचा... अभ्यासाच्या खोलीमध्ये निवांत झोपायचो... अगदी १० वी, १२ वी च्या परीक्षेच्या काळात पण...!!! आळशी, कशासाठी जन्म झालाय आपला हे माहिती नसलेला... दिशाहीन...!!!
बराच काळ घरात असून पण एकटा असलेला, मित्र (फारसे) नसलेला, एकटा जीव सदाशीव...!!! वडिलांची स्वप्नं खुप सारी, एकाने डॉक्टर व्हावं, एकानं इंजिनियर, मुलीने शिक्षक.... माझे सोडून सगळे झाले.... आयुष्याला दिशाच मिळाली नाही... समुद्रमध्ये नावाड्याविना भटकत आललेल्या शिडाच्या जहाजा प्रमाणे....!!! वारा माझी दिशा ठरवायचा.... मार्ग तयार करायचा प्रश्नच नव्हता.... समोर दिसेल त्या मार्गाने चालायचे एवढेच मला माहिती होते....
माझ्या मित्रांना वाटते की माझ्याकडे फार टॅलेण्ट वगैरे आहे... माझ्यात काही तरी असामान्य करायची ताकद आहे... माझ्या शिक्षकांना वाटायचे की मी वेगळा आहे... माझ्या बहिणीला देखील हेच वाटत असतं... मला वाटायचे की माझी अबिलिटी आहे म्हणूनच सगळे ऐकून घेतात... प्रेमापोटी सारे जन माझा माज, माझा गुरुर आणि माझे वागणे सहन करत होते.



मी उद्धट आहे, मानसिक रोगी आहे.... आळशी आहे... अप्पलपोटी आहे, मगरुर आहे, सायको आहे... मला जे करायचे आहे त्याची सुरूवात देखील नाही केली मी.... आणि माझे वय आज ३० च्या घरात आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटी (जर तेवढा विचार करावा एवढा वेळ असे एवढा जगलो तर....) मला मी आयुष्यात काहीच केले नाही याची खंत कायम राहिली तर मग माझा अंत दुखावह आहे....
माझ्या प्रियजणांनी एका लगंड्या घोड्यावर डाव लावलाय हे मला कळून चुकलेय... बघू आता जीवनाच्या रेस मध्ये किती वेळ आणि किती लांब पळता येते ते... त्यांचा इच्छा, अपेक्षा साठी पाळायला पाहिजेच... मग माझी इच्छा असो किंवा नसो...
धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत,
मठ्ठ होतो मी, पण तु किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस,
... माझ्या मरगळलेल्या चेहरयावर तु अनोखे तेज आनायचीस..
माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच, तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...
तुझं हे सत्र असचं कायम राहील, माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..
तु संगीतात एक नंबर असायची खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की तु किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल, एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन सांगितल माझ्या ह्रिदयातलं,
तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल....

प्रेमविवाह

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,

... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,

व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,

तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,

जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,

बाबा आपली जात कोणती हो?

जन्मल्यापासून पाच वर्षाचा होईपर्यंत आयुष्य फार छान असतं... तुमचे फार लाड होतात, तुम्हाला सगळे उचलून घेतात... काही जन प्रेमाने किस करतात.... आयुष्याचा सगळ्यात चांगला काळ असते - लहानपण...!!! लहानपणापासून जे माहिती नसतं ते येतं शाळेत नाव घालताना... शालेमध्ये नाव घालताना तुम्हाला पहिल्यांदा जात चिकटते जी मरेपर्यंत आणि मेल्यावर सरणावरही सुटत नाही... कारण मेल्यावर तुमच्या आस पास जी माणसं असतात ती बहुतेक करून तुमच्या जातीचीच असतात.
मला जात, धर्म, पंथ याचा काहीही संबंध नकोय माझ्या आयुष्यात...!!! मला आयुष्य हवंय पण त्याबरोबर इतर बंधनं नकोयत... कुणाशी लग्न करायचे... आमक्या जातीची सून नक्को...!!! आमक्या जातीत माझी मुलगी द्यायची नाही... कुणाची मुलगी सून म्हणून आणायची... असे काही नक्कोय...!!!



माझी अखेरची एकच इच्छा आहे - मला माझ्या मुलाने / मुलीने कधी विचारायला नक्को आहे "बाबा आपली जात कोणती हो?"

न संपणारा प्रवास...!!!

मी चालायला सुरू केले तेव्हा माझ्याबरोबर प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्गात ५० विद्यार्थी होते... म्हणजे समजा मी १० वीचा एक टप्पा, १२ वीचा एक टप्पा, ग्रॅजुयेशन एक आणि पोस्ट ग्रॅजुयेशनचा एक असे चार टप्पे पकडले तर माझ्या बरोबर एकूण किमान २०० लोक चालत होते... बरेच जन १० वी नंतर गायब झाले... त्यातले काही जण आपला वडीलोपर्जित धंदा चालवत आहेत, काही जण स्वताचा धंदा करीत आहेत, १२ वीचे काही इंजिनीयर झाले, काही केमिस्ट्रीचे काम करतात, काही शिक्षक झाले...



थोडक्यात बरेच जण ज्यांनी माझ्याबरोबर प्रवास चालू केला त्यांनी कुठे ना कुठे तरी आपले बस्तान बसवलेय...!!! याचे कारण त्यांचा फोकस असावा...!!! पण आजही माझा प्रवास कुठे संपवायचा आहे हे ठरलेले नाही... चालणे चालूच आहे, अंतहीन, दिशाहीन... क्षितीजाकडे जाणारा प्रवास संपत नसतो...!!!

प्लीज - मला माफ करशील ?"

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा टतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला. तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल...
खरचं खुप छान डेट झाली ती!



मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...! काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील ?"

ज्याला नाही कुणी त्याला .....

काही माणसे गेल्यावर कधीच दु:ख होत नाही... आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी तुम्हाला विचार करावा लागतो की ही गोष्ट धरायची की सोडायची पण असे अनेक क्षण येतात ज्यावेळी निर्णय पटकन होतात... मनाच्या कोप-यात सुद्धा यत्किन्चितही भीती नसते की या निर्णयाने पुढे काय होईल... कसा ठरेल हा निर्णय - योग्य की अयोग्य...!!!



माझ्या २७ वर्षांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी निर्णय घेणे अवघड होते... माझ्या ग्रॅजुयेशन नंतर काय करायचे, पि.जि. नंतर काय, किंवा आत्ता काय, लग्न कुणाबरोबर करायचे, राहायचे कुठे (सेट्टल की काय ते?) व्हायचे... आयुष्य काय म्हणून काढायचे - एक शिक्षक की संशोधक, संगणक क्षेत्रात काही करायचे की सिनेमात जायचे.... पण एका सुद्धा वेळी योग्य निर्णय घेता आला नाही... किंबहुना योग्य निर्णय म्हणजे काय हेच कळले नाही, पदरी पडले आणि पवित्र झाले असे जे येईल समोर ते आपले ध्येय मानून फॉलो करत राहिलो आणि आज जिथं उभा आहे - एक प्रवासी म्हणून ज्याला पुढचा रस्ता माहिती नाही, ज्याचा पुढे जायचा मॅप हरवलाय... !!!



खूप विचार करून निर्णय घेतला किंवा न विचार करता घेतला की असंच काहीतरी होत असावं... मी कधी योग्य निर्णय घेतले नाहीत. आळस केला... सगळे माझ्याभोवती असायचे, माझे फ्रेंड्स म्हणून काही साथीदार म्हणून तर काही फक्त कलिग्ज म्हणून... मला फरक करता आला नाही - सगळे माझ्या भोवती जमले होते कारण त्यांना माझ्याकडून काही ना काही पाहिजे होते. सगळे माझा फायदा घेत गेले आणि मी त्यांना घेऊ देत गेलो, काहींनी माझे शारीरिक श्रम वापरले (माझी एक्स जि.एफ.), ब-याच लोकांनी माझ्याकडील थोड्याफार वित्ताचा फायदा करून घेतला....
माझं ब-यापैकी असं झाला होतं - ज्याला नाही कुणी त्याला "राहुल महामुनी"


...