माझ्या मना रे ऐक जरा...!!

माझ्या मित्रांना माहिती आहेच की माझ्या मनाची अवस्था गेली वर्षभर काय असावी? कारण त्यांना माझ्या आयुष्यातल्या घडामोडी जरा जास्तच जवळून माहिती आहेत... माझे प्रेम, त्याचे अपूर्णत्व आणि त्यानंतर झालेल्या घटना, त्यांचा माझ्या मनावर झालेला परिणाम हे सगळ त्यांना व्यवस्थित माहिती आहेच..!! पण बर्‍याचशा गोष्टी मला नंतर कळल्या, ती गेल्यावर, त्या आधी कळल्या असत्या तर त्याच्या फार चांगला इंपॅक्ट झाला असता, कदाचित जेवढा त्रास झाला तेवढा झाला नसता?


माझ्या आयुष्यात ती आली, ते तिच्या मर्जिने, तिच्याच हट्टाने !!! तीनच नाते वाढविण्याचा हट्ट केला, नेहमीच...!!! जेव्हा जेव्हा मी तिला आवर घालू इच्छीला तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ वाईटच घेतला...!!! तिला वाटायचे की, मी तिला टाळतोय, तिच्या जातीमुळे, आणि मी तिला सोडणार वगैरे काही तरी आहे असे काहीतरी...!!!
पण झाले उलटेच, मी तिला सोडायाचे वगैरे सोडाच, तिने मला "चांगली संधी" आली तेव्हा अलगद तिच्या आयुष्यातून काढून टाकले, अगदी अ ल ग द ...!!!



मग उरल्या, तिच्या आठवणी आणि काही प्रश्न... तिने असे का केले? असे काय मी केले ज्यामुळे तिने असा निर्णय घेतला, किंवा तिला घ्यावा लागला !!! माझ काय चुकल? नक्की काय?
न सांगता कुणी बोलणे सोडावे, किंवा तुम्ही बोलत असताना सगळ छान चालले असताना कुणी तरी अचानक काहीही कारण नसताना इग्नोर कराव यासारख दु:ख ते कशात? मला आज सुद्धा माहिती नाही की तिला किती फरक पडला असता माझ्याशी लग्न करून पण मला पडला असता, नव्हे पडलाय...! तिच्या मनातले योग्य वेळी कळले असते तर...? खूप बर झाले असते, कारण माझ्या आयुष्याची वाया गेलेले दिवस मला कामासाठी मिळाले असते (वास्तविकत: तिने मला ते वाया घालव असे सांगितले नसतानाही...!!!)



तिची आठवण येतेय असे म्हणून पण काही उपयोग नाही... आज मी एकटा आहे हे सत्य आहे... आणि कदाचित तिला याचा काही फरक पडत नसावा... कारण स्वत:च्या आयुष्यात फरक ना पाडू शकणारा मी कुणाच्या आयुष्यात
नसन्याने कुणाला काय फरक पडणार?


"याबद्दल न विचारले तर बरे होईल?"
प्लीज....!!!

शब्द माझ्या मनातले...

काहींना सगळ्या गोष्टी सहज मिळतात, काहींना भांडून, काहींना हिसकावून, तर काहींना काहीही केल तरी नाही... एका मित्राची गोष्ट, जी मला इथ नमूद करावी वाटते... लहानपणापासून त्याच्याकडे काहीही कमी नव्हत पण एक गोष्ट मात्र त्याला अलाउड नव्हती, ती म्हणजे स्वताच्या आयुष्याचे स्वत: निर्णय घ्यायचा...!!! काहीही झाले तरी नाही, आणि या काहीहीच्या नादात त्याने स्वत:च्या आयुष्याची वाट लावून घेतली... मार्ग अनेक आहेत त्याच्यापुढे, स्वताला संपवायचे, निघून जायचे, किंवा आहे तसे जगायचे...!!! आणि त्याने मार्ग निवडलाय आहे असे जगायचे... आणि तो पण निर्णय त्याचा नाही, नेहमीप्रमाणे...!!!

त्याच्या उन्यापुर्‍या २५ - २६ वर्षाच्या आयुष्यामध्ये बर्‍याच गोष्टी मनाविरुद्ध झाल्या पण त्याना रिआक्ट न करण हे त्याच्या अंगवळणी पडलय... आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात त्याला इण्टरेस्ट नाहिये बहुदा...!!!

त्याला त्याच्या वडिलाचे राहिलेले आयुष्य जगायचे असे त्याला वाटते, त्याचे विचार, त्याच्या कृती यांना काहीही महत्व नाही आणि त्या मांडल्या तरी त्याचा काही उपयोग नाही असे त्याच्या मनात येते, निगेटीव्ह व्हायला लागलाय, त्याचा "तो काही तरी करू शकतो" हा आत्मविश्वास संपू लागलाय...!!! त्याच्या भविष्यासाठी हे बरोबर नाही, पण त्याला हे समाजात नाही. वडिलांवरच्या अतीव प्रेममुळे, त्याच्या रिस्पेक्टमुळे किंवा त्यांच्या भीतीने त्याला गप्प केलेय, आणि त्याच्यातला "तो" कधीच संपलाय...!!!

त्याला गरज आहे, "जे त्याला हव आहे ते करण्याची..." कारण आयुष्यभर तो तेच काम करणार आहे, त्याला हवा आहे एक साथीदार जो त्याच्या आयुष्याचे एकांगी निर्णय घेण्याच्या आणि तो निर्णय शांतपणे ऐकून घायच्या प्रोसेसमुळे गेलाय... त्याचे दु:ख मनात आहेच, पण सध्या त्याच आयुष्य चांगले व्हायचे असेल तर, त्याला त्याचे आभाळ गावसण्याची एक संधी त्याच्या घरच्यांनी द्यावी असे मला वाटतेय...!!!

का माहिती नाहीए, हे लिहिताना माझ्या हाताला झणझान्या यायला हव्या होत्या, पण त्या मेंदूला येतायत..!!!
त्याने निर्णय घेणे आवश्यक आहेच, आणि तो पण लवकर...!!! त्याचा साथीदार, त्याचे आयुष्य आणि त्याचा वेळ... यापैकी काय आणि कधी? माहिती नाहिये!!!

काही वेळा काही बोलता आले नाही तरी, गप्प राहणे हा पर्याय नसतो!!!

मी तसा थोडासा लाऊड वगैरे काही तरी वाटतो, जे मला पहिल्यांदा ऐकत असतात त्याना...!!! माझ्या आयुष्यात बर्‍याच घटना आल्या ज्यावेळी माझ्या परिस्थितीचा विचार न करता, परिणामाची चिंता न करता बोललो, अगदी अस असताना की, आय हॅव टू लुझ माय जॉब...? पण माझ्यापुढे पर्याय नसला तरी, आणि असला तरी पण मी सेल्फ रीस्पेक्ट पुढे काही करू शकतो, हे मला नंतर विचार करताना जाणवते...!!!

माझ्या उण्यापुर्‍या २७ वर्षांच्या आयुष्यामध्ये मी असाच वागत आलो, असे समजून की, हेच बरोबर आहे... पण आता समजतय की, नेहमी अस वागुन चालत नाही... काही वेळेला मोठी उडी मारायची असेल ना, की थोडे मागे आलेले बरे असते, त्याने उडी लांब जाते, असे वाठारे गूरुजीनी पहिलीमधे संगिताल्याचे आठवते, वाठारे गुरुजी कुठे आहेत हे माहिती नाही, पण त्यानी सांगितलेले शब्द बरोबर आहेत, अजुन...!!!



मनाच्या गाभार्‍यात काही गोष्टी दफन केल्या तर बर्‍या असतात, तशीच काही नाती असतात, ज्याना नाव न देता ती सांभाळावी लागतात, नाव नसल म्हणून काही त्या नात्यांचे महत्व कमी होत नाही... पण त्याच नाव सांगण्याची वेळ आल्यावर योग्य नाव नसल्याने त्याच्यावर बोट उठु शकत...!!!

का कुणास ठाउक पण काही वेळा काही बोलता आले नाही तरी, गप्प राहणे हा पर्याय नसतो!!!

फुलस्टॉप आणि कॉमाज...!!!

समाजातल्या सर्वच घटनाकडे आपण एकदम सिरियसली बघत नसावे... पण काही घटना मनावर फार खोलवर रुतून बसतात... परवा ९ एप्रिल २०१०. सर्वासाठी एकदम जनरल दिवस असावा, पण माझ्या आयुष्यात खास... खास अनेक कारणानी, या दिवशी अनेक घटना झाल्या माझ्या आयुष्यात, पण काही गोष्टी झालेल्याचे कधीच दु:ख करायचे नसते ना, त्यापैकी बहुतेक होत्या...!!!
आयुष्य एकदाच मिळते आणि ते तसच जगाव या मताचा मी... माझ्या आयुष्यात अनेक कॉमाज पडले.... पण आता फूलस्टॉप...
पण फूल स्टॉप पण तसाच पाहिजे... अगदी फूलस्टॉप शोभण्यासारखा !!!
आहे एक डोक्यात पण बघुया काय होतय ते !!!
लेटस् होप फॉर द बेस्ट !!!

उत्तर मात्र शून्य...!!!

काही गोष्टी फार चांगल्या असाव्यात अस आपल्याला नेहमी वाटते... आपल्या सभोवताळाची माणसे, त्यांचे स्वभाव, आपली परिस्थिती, आपले वर्तमान, किंबहुना आपले भविष्य... पण सगळ्याच गोष्टी आपल्या मानासारख्या होत नाहीत... बर्‍याचदा नाहीच.... शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून पण होत नाहीत. मी माझ्या भविष्याबद्दल कायच्या काय कल्पना करून ठेवल्या होत्या... अगदी फिल्मी स्टाइल...
पण आळस काहीच शक्य नाही झाले आणि मी जसा आजा आहे, तसा झालो... कंप्यूटरची फार आवड, पण काहीच करता आले नाही... चित्रकलेची आवड पण ते पण शक्य झाले नाही... जे आयुष्यभर अव्होइड करत आलो, तेच पदरी पडले... आणि आयुष्याची कॅलक्युलेशन केल्यावर आपणाला काय मिळाले याचे उत्तर एक लाइफ जे सर्वानी आपल्यासाठी चांगले केले... पण आपण काय परत दिले सगळ्याना याच उत्तर मात्र शून्य आले... असे कसे होऊ शकते, कोणास ठाउक, पण असे झालेय असे मला का कुणास ठाउक?
मला कायम असे वाटते की, मी एखाद्या सेटल्ड मुलीशी लग्न करावे, त्याचे कारण म्हणजे जे आयुष्यात करावयाचे राहिलेय ते मला करता येईल, पोसिबल्ली... पण, पण तिने माझ्याशी का लग्न करावे याचे उत्तर माझ्याकडे नाही... शेवटी तिच्या मनाचा पण विचार करण इंपॉर्टेंट आहेच ना...!!!
आय कॅन नॉट बी सो सेल्फीश !!!
not at least wid her lyf's sacrifice !!!
Leaving the things back to my states - two states of my mind !!!
Rahul...!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
- अनामिक कवी

मला ऑनलाइन सर्च करता करता ही कविता मिळाली, आणि मना थांबले... सगळे सोडून शाळेचे दिवस आठवले...!
लहानपणिचा वेड्या गोष्टी, निरनिराळे खेळ, आणि मज्जा... म्हणून हो पोस्ट... अनामिक कवीचे अनेक आभार...!!!! मला परत काही वेळासाठी का असेना लहान केल्याबद्दल!!
!

फ़क्त एकदाच

फ़क्त एकदाच तुला मनसोक्त हसतना पहायचय
निदान त्यासाठी तरी मला विदुशक बनुन तुज़्या समोर यायचय

फ़क्त एकदाच तुज़्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचय ,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास बसायचय.

फ़क्त एकदाच तुज़्या मवू केसानवरुन हळुवार हात फ़िरवायचाय ,
निदान त्यासाठी तरी एक तरी गजरा तुज़्या केसात घालायचाय ,

फ़क्त एकदाच तुला माज़्या साठी बेच्येन होताना पहायचय,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळे च्या ऊशिरा यायचय.

फ़क्त एकदाच तुला अनिवार रडतना पहायचय,
निदान त्यासाठी तरी मला खोट खोट मरायचय

- अनामिक कवी

तु निघुन गेलीस

तु निघुन गेलीस, कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे, कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........

रडू नकोस उगीच, चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले, तुला सगळे समजावताना................

आभाळं भरले आहे, अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही, उगीचच कारण नसताना....................

अजूनही जातो त्याच बागेत, रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते, सकाळी ती कोमेजताना...................

झालेच नाही आपले बोलणे, सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय, एकटा कविता करताना................

माहीत नाही पुन्हा कधी भेटु, वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा, वेगळ्या जगात राहताना..............

विषय शोधावे लागतील आता, संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं, पुन्हा एकत्र असताना.....................

शुन्यच आहे आयुष्य माझे, उणे तु असताना
धरलास का हात सांग तु, सोडुनच जायचे असताना...............

सोन्यासारखा संसार करशील, दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला, ती बागेतली रातराणी फ़ुलताना.............
- अनामिक कवी

मी असाच आहे,

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील, स्वतःच्या शोधात फिरणारा.....

मी असाच आहे, खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे , कुणालाही सहज आपलसं करणारा......

मी असाच आहे, जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म मानाणारा.....

मी असाच आहे, दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसता, नियतीला लाजवणारा....

मी असाच आहे, इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र, काळोखात आठणारा.....

मी असाच आहे, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात, घर एक करुन राहणारा........


-अनामिक कवी

एकच चहा, तो पण कटींग...

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

-अनामिक कवी