न संपणारा प्रवास...!!!

मी चालायला सुरू केले तेव्हा माझ्याबरोबर प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्गात ५० विद्यार्थी होते... म्हणजे समजा मी १० वीचा एक टप्पा, १२ वीचा एक टप्पा, ग्रॅजुयेशन एक आणि पोस्ट ग्रॅजुयेशनचा एक असे चार टप्पे पकडले तर माझ्या बरोबर एकूण किमान २०० लोक चालत होते... बरेच जन १० वी नंतर गायब झाले... त्यातले काही जण आपला वडीलोपर्जित धंदा चालवत आहेत, काही जण स्वताचा धंदा करीत आहेत, १२ वीचे काही इंजिनीयर झाले, काही केमिस्ट्रीचे काम करतात, काही शिक्षक झाले...



थोडक्यात बरेच जण ज्यांनी माझ्याबरोबर प्रवास चालू केला त्यांनी कुठे ना कुठे तरी आपले बस्तान बसवलेय...!!! याचे कारण त्यांचा फोकस असावा...!!! पण आजही माझा प्रवास कुठे संपवायचा आहे हे ठरलेले नाही... चालणे चालूच आहे, अंतहीन, दिशाहीन... क्षितीजाकडे जाणारा प्रवास संपत नसतो...!!!

0 comments:

Post a Comment